पुणे: ठाणे चाईल्ड हेल्पलाईनने वेळीच हस्तक्षेप करून (Pune Shocking News) रोखलेला एक बालविवाह, दुर्दैवाने कौटुंबिक हट्टामुळे एका भीषण गुन्ह्यात रूपांतरित झाला आहे. चाईल्ड हेल्पलाईनला (Pune Crime) चकवा देऊन अल्पवयीन मुलीला गावी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी बाणेर पोलिसांनी अतुल दादा झेंडे (वय २३, रा. लोणंद, जि. सोलापूर) या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १७ वर्षीय मुलीचा विवाह अतुल झेंडे याच्याशी लावून दिला जाणार होता. मात्र, ठाणे चाईल्ड हेल्पलाईनला या बेकायदेशीर विवाहाची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने हा बालविवाह रोखला होता. प्रशासनाने मुलीची सुटका केली होती, मात्र आरोपीच्या कुटुंबीयांनी कायद्याला धाब्यावर बसवून वेगळीच चाल खेळली.
नोव्हेंबर २०२५ मध्ये आरोपी अतुल झेंडेचे वडील पीडित मुलीला आपल्या लोणंद येथील घरी घेऊन गेले. तिथे तिला सक्तीने मंगळसूत्र घालण्यास लावले आणि तुमचे लग्न झाले आहे, असे सर्वांना सांगण्यास भाग पाडले. मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असूनही, आरोपी अतुल झेंडे याने नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केले.
या नरकयातनेतून सुटका करून घेत पीडित मुलीने अखेर पुण्याच्या बाणेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आपल्यावर झालेला अन्याय सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल केला आणि आरोपी अतुल झेंडे याला सोलापूर जिल्ह्यातून अटक केली आहे.
सध्या बाणेर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक शैला पाथरे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. चाईल्ड हेल्पलाईनने एकदा लग्न रोखल्यानंतरही मुलीला पुन्हा त्याच जाळ्यात ढकलणाऱ्या नातेवाईकांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे बालविवाह रोखणाऱ्या यंत्रणांच्या मर्यादा आणि पालकांची मानसिकता यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.







