पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात (Pune Politics) काहीही घडू शकते, हे याआधीच्या अनेक (Pune Mahapalika Election) घडामोडींनी दाखवून (Ajit Pawar) दिले आहे. गेल्या 3 ते 4 वर्षांत राज्यातील (Sharad Pawar) राजकारणात मोठे बदल झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली. राष्ट्रवादी (Nilesh Lanke) काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली वेगळा गट निर्माण झाला, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह बहाल केले. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून ती अनेक काळापासून प्रलंबित आहे. (Latest Marathi News)

अशातच आता एक नवी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढणारे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे या चर्चांना वेग आला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाविकास आघाडीचे पुढे काय होणार, असा प्रश्नही निर्माण होतो. तसेच भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येणार का, अशीही चर्चा होत आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.
निलेश लंके यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलताना स्पष्ट मत मांडले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल आणि आम्हालाही आनंद होईल, असे त्यांनी सांगितले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा विकास शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली झाला असून अजित पवार यांनीही त्याच मार्गावर काम केले आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस हा केवळ पक्ष नसून एक परिवार आहे. मतभेद असले तरी सुख-दुःखात दोन्ही गट एकत्र राहिले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
राजकारणात सतत बदल होत असतात, त्यामुळे भविष्यात काय घडेल हे सांगता येत नाही, असे सांगत सर्वांनी वाट पाहावी, असे आवाहन लंके यांनी केले. निवडणुकीदरम्यान दडपशाही सुरू असल्याचा आरोप करत जनताच योग्य वेळी याला उत्तर देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुण्यात अजित पवार गटाकडून उमेदवारी देताना संबंधित प्रभागातील नागरिकांची भूमिका महत्त्वाची असते, असे मतही त्यांनी मांडले.







