पुणे: पुणे-मनमाड या अतिशय वर्दळीच्या रेल्वे मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. या मार्गावरील सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि गाड्यांचा वेग (Pune-Manmad Train) सुधारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उच्च दर्जाचे नवीन रूळ टाकण्याचे (Pune-Manmad Railway) काम सुरू केले आहे. हे नवीन रूळ 550 जीएमटी म्हणजेच तब्बल 55 कोटी टन वजन सहन करण्याची क्षमता असलेले आहेत. त्यामुळे (Pune News) या मार्गावरील रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होणार आहे.(Latest Marathi News)

पुणे रेल्वे विभागात पुणतांबा ते कन्हेगाव स्थानकांदरम्यान सध्या हे काम वेगाने सुरू आहे. या कामासाठी ‘पीक्यूआरएस’ म्हणजेच प्लेसर क्विक रिलेइंग सिस्टीम या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद न करता, ठराविक कालावधीसाठी ब्लॉक घेऊन हे काम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अवघ्या 35 दिवसांत सुमारे 9 किलोमीटर लांबीचे रूळ बदलण्यात रेल्वेला यश आले आहे.
यापूर्वी या मार्गावर 52 किलो वजनाचे रूळ वापरले जात होते. आता त्यांच्या जागी 60 किलो वजनाचे अधिक मजबूत आणि टिकाऊ रूळ बसवण्यात येत आहेत. त्यामुळे रुळांची गुणवत्ता आणि क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या सुधारणेमुळे सध्या ताशी 110 किलोमीटर असलेला गाड्यांचा सरासरी वेग भविष्यात 130 किलोमीटरपर्यंत वाढवता येणार आहे. याचा थेट फायदा प्रवाशांना होणार असून पुणे-मनमाड प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
तसेच, अल्ट्रासॉनिक टेस्टिंगसारख्या आधुनिक तपासणी पद्धतीमुळे रुळांमध्ये होणारे सूक्ष्म तडे वेळेत ओळखता येणार आहेत. त्यामुळे रूळ तुटून होणाऱ्या अपघातांची शक्यता कमी होईल. अवजड मालगाड्यांमुळे रुळांवर येणारा ताणही या नव्या रुळांमुळे कमी होणार आहे. एकदा हे नवीन रूळ पूर्णपणे बसवले की पुढील 15 ते 20 वर्षे या मार्गावर पुन्हा रूळ बदलण्याची गरज भासणार नाही. यामुळे देखभाल खर्च कमी होईल आणि गाड्यांचे वेळापत्रक अधिक अचूक ठेवणे रेल्वेला शक्य होणार आहे.







