उरुळी कांचन, (पुणे) : सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुनम नवनाथ आढाव यांची गुरुवारी (ता. 13) बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सोरतापवाडीच्या सरपंच स्नेहल विठ्ठल चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे उरुळी कांचनच्या मंडल अधिकारी नूरजहाँ सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी पुनम आढाव यांचा एकमेव अर्ज आल्याने नूरजहाँ सय्यद यांनी पुनम आढाव यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड व तलाठी सुधीर जायभाय यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.
पुनम आढाव यांची सरपंचपदी बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाक्यांच्या आतिषबाजी पुणे – सोलापूर महामार्गासह परिसरात मोठा जल्लोष करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य बाळाप्पा चौधरी, उद्योजक बाळासाहेब चौधरी, माजी सरपंच स्नेहल चौधरी, संध्या चौधरी, उपसरपंच विलास चौधरी, माजी उपसरपंच निलेश खटाटे, शंकर कड, विजय चौधरी, सदस्य सनी चौधरी, शशिकांत भालेराव, रविंद्र गायकवाड, सुनीता चौधरी, सुप्रिया चौधरी, मनीषा चौधरी, अश्विनी शेलार, सोनाली लोंढे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ आढाव, अमित चौधरी, कृषिराज चौधरी व गावातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच पुनम आढाव म्हणाल्या, “सोरतापवाडी गावच्या विकासासाठी गट-तट बाजूला ठेवून गावच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. गावासाठी राहिलेल्या उर्वरित कामासाठी वाढीव निधी मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांना बरोबर घेऊन राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.”







