पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुत्र पार्थ पवार (Parth Pawar Land Scam) हे जमीन व्यवहारामुळे चांगलेच (Anjali Damania) अडचणीत आले आहेत. या प्रकरणाची (Ajit Pawar) संपूर्ण राज्यात चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावर अंजली दमानिया यांनी थेट अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राइजेस या कंपनीने केवळ जागा कागदोपत्री घेतली नाही, तर एका महिन्यानंतर त्या जागेचा ताबा मिळवण्यासाठी गंभीर प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कंपनीकडून सिक्युरिटी गार्ड जे बाउन्सरसारखे होते त्यांना पाठवून पोलिसांच्या मदतीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद आणि पुण्याच्या पालक मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. (Maharashtra Politics)

दमानिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पोलिस स्टेशन डायरीतील नोंदीही शेअर केल्या आहेत. त्या नोंदींनुसार १६ जून २०२५ रोजी दुपारी मुंढवा पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली की अॅड. तृप्ती ठाकूर यांनी तक्रार केली होती. त्यांनी सांगितले की सिक्युरिटी कंपनीच्या लोकांना बॉटनिकल गार्डनमध्ये प्रवेश दिला जात नाही आणि पोलिसांची मदत हवी आहे. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले. तिथे बॉटनिकल गार्डनचे प्रमुख बाळासाहेब कदम आणि काही कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी जागा गार्डनच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सिक्युरिटी कंपनीच्या लोकांनी आपली तक्रार महसूल विभागाकडे किंवा न्यायालयात मांडावी, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दोन्ही बाजूंना कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी सूचना दिल्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. या सर्व घडामोडींमुळे पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहारावर आणि त्यामागील प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता या प्रकरणाची चौकशीकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे.







