पुणे: बदलत्या तंत्रज्ञानामुळे जमिनीच्या (Land Registration) मोजणी प्रक्रियेत मोठा बदल झाला असून डिजिटल मोजणीमुळे पारदर्शकता (Agriculture News) वाढली आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या (Satbara Utara) हद्दींच्या वादांना आता डिजिटल मोजणीमुळे नवे वळण मिळत आहे. या प्रक्रियेत (7/12 Utara) पूर्वी झालेल्या चुकीच्या मोजमापांचे (Land Buy) वास्तव समोर येत आहे. मात्र, काही वेळा मोजणीदरम्यान एखाद्या (Land Registration Rules) शेतकऱ्याची जमीन शेजाऱ्याच्या हद्दीत गेल्याचे निष्पन्न होते. अशा परिस्थितीत ती जमीन पुन्हा स्वतःच्या नावावर मिळवण्यासाठी ठरावीक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक ठरते. (Latest Marathi News)

अधिकृत पंचनामा
डिजिटल मोजणी पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम अधिकृत पंचनामा आणि मोजणी अहवाल घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. तलाठी किंवा भूमापन अधिकारी मोजणी झाल्यावर सविस्तर पंचनामा तयार करतात. या अहवालात संबंधित सर्व्हे नंबर, क्षेत्रफळ, प्रत्यक्ष हद्दी आणि कोणत्या जमिनीचा भाग शेजाऱ्याच्या ताब्यात आहे याची स्पष्ट नोंद असते. हा दस्तऐवज पुढील सर्व कायदेशीर प्रक्रियेचा आधार ठरतो.
फेरफार नोंदणीसाठी अर्ज
यानंतर शेतकऱ्याने तालुका भूमापन कार्यालयात फेरफार नोंदणीसाठी अर्ज करावा लागतो. अर्जासोबत मोजणी अहवालाची प्रत, सध्याचा 7/12 उतारा, जुनी खरेदीखत किंवा वारसा नोंद तसेच ओळखपत्रे जोडावी लागतात. अर्जामध्ये जमीन चुकीच्या नावावर किंवा चुकीच्या हद्दीत नोंद झाल्याचे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक असते. तलाठी आणि मंडळ अधिकारी कागदपत्रांची तपासणी करून प्राथमिक पडताळणी करतात.
तहसील कार्यालयाकडे वर्ग
जर शेजारी शेतकरी या अर्जावर आक्षेप घेत असेल तर प्रकरण तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात येते. तहसीलदार दोन्ही पक्षांना नोटीस बजावून सुनावणी घेतात. मोजणी अहवाल, जमिनीच्या नोंदी, जुनी कागदपत्रे आणि 7/12 उतारे यावर निर्णय घेतला जातो. निर्णयानंतर फेरफार नोंद 7/12 वर करण्यात येते.
जर निर्णयावर आक्षेप असेल तर उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करता येते. काही गंभीर प्रकरणे सिव्हिल कोर्टातही जातात. त्यामुळे मोजणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम नकाशा आणि सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक जतन करणे अत्यंत आवश्यक आहे.







