मुंबई: बिहार विधानसभेच्या (Maharashtra Politics) निवडणुकीचा निकाल समोर आला (National People’s Party)आणि एनडीएला मोठं यश मिळालं आहे. या (Local Bodies Election) निकालाचा प्रभाव राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे. मात्र या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नव्या राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. कारण राज्यात एका नव्या पक्षाने प्रवेश केला आहे, ज्यामुळे भाजपसह इतर पक्षांची चिंता वाढली आहे. (Breaking News)

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळे होत निर्माण झालेल्या नॅशनल पीपल्स पार्टीने महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे. नॅशनल पीपल्स पार्टीची स्थापना 2013 साली मेघालयचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांनी केली होती. काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेदांनंतर त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. आदिवासी आणि स्थानिक समाजाच्या हक्कांसाठी काम करणे हे या पक्षाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
2023 च्या मेघालय विधानसभा निवडणुकांमध्ये हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आणि त्याच वर्षी याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही मिळाला. मेघालय, मणिपूर, नागालँड, झारखंड आणि असाम या राज्यांमध्ये या पक्षाचा प्रभाव आहे. सध्या मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हे या पक्षाचे नेते आहेत. काही राज्यांत एनडीएसोबत या पक्षाने युतीही केली आहे.
आता या पक्षाने महाराष्ट्रातील राजकारणात औपचारिक प्रवेश केला आहे. नुकतीच दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी अमित वेळूकर यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे अमित वेळूकर सध्या राज्य दौऱ्यावर असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आदिवासी भागात उमेदवार देण्याची तयारी पक्षाकडून सुरू आहे. महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार कसा करायचा आणि कोणत्या भागात काम करायचे, याबाबतची माहिती प्रदेशाध्यक्ष अमित वेळूकर यांनी दिली.







