Nandgaon News: नांदगाव: नांदगाव एस.टी. आगारातील निष्काळजीपणाची एक घटना समोर येत आहे. या निष्काळजीपणामुळे थेट प्रशासनाला फटका बसला आहे. जिल्हा ग्राहक मंचाने तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देत एस.टी. महामंडळाला एकूण 55,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. चला तर जाणून घेऊ नेमकं काय प्रकरण

लग्नासाठी बुक केलेली बस चुकीच्या ठिकाणी पोहोचवली आणि नंतर भररस्त्यात बंद पडली या चुकांमुळे लग्नसमारंभात मोठा घोळ झाला. या सलग चुका झाल्याने अखेर ग्राहकाने थेट मंचाचा दरवाजा ठोकावला.
नांदगाव येथील सलून व्यवसायिक सतीश बीडवे यांच्या मुलाचे 23 फेब्रुवारी 2023 रोजी लग्न होते. बाबरा तालुका फुलंब्रु जि. छत्रपती संभाजी नगर येथे लग्न होते. त्यासाठी त्यांनी नांदगाव आगारातून एस.टी बस बुक केली होती आणि त्यांनी 22,000 रुपये रक्कम भरले. मात्र, लग्नाच्या दिवशी बस चालकाने चुकीच्या मार्गाने निघाली. बस थेट नस्तानपूर येथे पोहोचली. ऐन लग्नाच्या दिवशी बस उशिरा बिडवे यांच्या घरी दाखल झाली.
ग्राहकाने दिलेल्या तक्रारीनुसार, बस जवळपास 50 किलोमीटर अंतर दूर गेल्यानंतर भररस्त्यात बंद पडली. या घटनेची तक्रार थेट आगार अधिकाऱ्यांना दिली. त्यावेळी त्यांनी बस अर्ध्या तासात बस मिळेल असं सांगितले. परंतु प्रत्यक्षात नवीन बस 3 तासानंतर आली. या सर्व गोधंळामुळे लग्नाला येण्यास उशीर झाला. दुपारी 12.30 वाजताच्या मुहूर्ताचे लग्न जवळपास 2.5 to 3.5 तास उशिरा पार पडले. या संपूर्ण प्रकारामुळे वर-वधूपक्षाला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. तर अनेकांनी एसटीवर संताप व्यक्त केला.
या संपूर्ण घटनेची तक्रार संतापलेल्या बिडवे यांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे केली. सुनावणीदरम्यान त्यांनी 5 लाख रुपयांची भरपाई मागितली होती. दोन्ही बाजूंची मते ऐकल्यानंतर ग्राहत मंचाने एस.टी महामंडळाची पूर्ण निष्काळजीपणा ठपका ठेवत तक्रारदाराला रु. 55,000 नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.






