Dhurandhar Movie: बॉलिवूडमध्ये सद्या चर्चेत ठरला आहे तो धुरंधुर चित्रपट. मागील आठवड्या प्रदर्शित झालेला चित्रपटाने १५० कोटी हून जास्त कमाई केली. चित्रपटाचे कलेक्शन वाढत असल्यामुळे बॉलिवूडमध्ये दिग्दर्शकांचे कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावर देखील चित्रपटाचे गाणी आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. Dhurandhar Movie

चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर, अभिनेता संजय दत्त, रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अक्षय खन्ना (Akshay Khanna) यांच्या कामगिरीचे सोशल मीडियावरून कौतुक केले आहे. चित्रपटातील गाणी आणि अक्षय खन्ना यांनी सोशल मीडियावर धूम माजवली आहे. अभिनेता ऋतिक रोशन यांनी देखील इतरांप्रमाणे त्यांनीही कौतुक केले परंतू एकीकडे त्यांनी चित्रपटाबद्दल स्पष्ट भूमिका मांडली आहे.
ऋतिकने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर “धुरंधर”चे पोस्टर शेअर करत एक मोठा मेसेज लिहिला. “चित्रपट मला खूप आवडला. कठीण प्रसंगांवर मात करत उत्तम सिनेमाची निर्मिती करणारे कलाकार मला नेहमी भावतात. ‘धुरंधर’ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. ही कथाृ आकर्षित आणि मनाला भिडणारी आहे,” असे तो म्हणाला.
परंतु, त्याने पुढे लिहिले की, “मी या चित्रपटात दाखवलेल्या राजकीय भूमिकेशी पूर्णत: सहमत नाही.” त्याच्या मते, जागतिक नागरिक आणि जबाबदार अभिनेता या नात्याने चित्रपट निर्मात्यांवर काही सामाजिक जबाबदाऱ्या असतात, ज्याविषयी तो मोठ्या प्रमाणावर चर्चा करू शकतो. तरीही, प्रामाणिक प्रेक्षक म्हणून या चित्रपटाने त्याला किती प्रभावित केले, किती शिकायला मिळाले ते तो नाकारू शकत नाही, असे त्याने स्पष्ट केले.
म्हणजेच, ‘धुरंधर’ चित्रपटाच्या कलात्मक आणि तांत्रिक बाजूंचं ऋतिकने सोशल मीडियावर कौतुक केलं असलं, तरी कथेतल्या राजकीय मांडणीशी तो सहजतेने जोडला गेला नाही, हे त्याच्या वक्तव्यावरून जाणवते.






