पुणे: राज्याच्या अनेक भागांत (Summer Diet Tips) तापमानाचा पारा 40 अंशांच्या पार गेला आहे. कडक उन्हामुळे केवळ घामच येत नाही, तर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन थकवा, चक्कर येणे आणि उष्माघाताचा धोका वाढतो. अशा वेळी औषधांपेक्षा ‘आहार’ हेच मोठे संरक्षण कवच ठरू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात आपण काय खातो यापेक्षा काय टाळतो, याला जास्त महत्त्व आहे. केवळ तहान लागल्यावर पाणी पिणे ही मोठी चूक आहे. उन्हाळ्यात शरीराला सतत Hydration गरज असते.

-
लिंबू सरबत आणि पन्हे: केवळ साधे पाणी न पिता त्यात लिंबू, मीठ आणि थोडी साखर घालून प्यावे, जेणेकरून शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स टिकून राहतील.
-
नारळ पाणी: हे नैसर्गिकरित्या शरीरातील उष्णता शोषून घेते.
पालेभाज्या आणि फळांचा राजा ‘कलिंगड’
उन्हाळ्यात पचनशक्ती मंदावते, त्यामुळे जड अन्न खाणे टाळावे.
-
पाणीदार फळे: कलिंगड, टरबूज, संत्री आणि द्राक्षे यामध्ये ९०% पेक्षा जास्त पाणी असते. ही फळे नैसर्गिक थंडावा देतात.
-
काकडी: रोजच्या जेवणात काकडीचा समावेश हमखास करावा. काकडी शरीर हायड्रेटेड ठेवण्यासोबतच त्वचाही टवटवीत ठेवते.
दही आणि ताक
जेवणात दह्याची कोशिंबीर किंवा जेवणानंतर एक ग्लास ताक म्हणजे उन्हाळ्यातील अमृतच. ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे पचन सुधारतात आणि शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर काढण्यास मदत करतात.
हे पदार्थ तातडीने टाळा!
-
तळलेले आणि मसालेदार पदार्थ: जास्त तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढते आणि पित्ताचा त्रास होतो.
-
चहा आणि कॉफी: कॅफीनमुळे लघवीला जास्त वेळ जावं लागत, ज्यामुळे शरीर लवकर डिहायड्रेट होते. त्याऐवजी थंड दूध किंवा आमसूल सरबत उत्तम.
-
मांसाहार कमी करा: उन्हाळ्यात मांस पचायला जड जाते आणि त्यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते.
दरम्यान, हे सोपे आणि महत्वाचे बदल तुम्ही केल्यास तुम्ही उन्हाळ्यातही निरोगी रहाल. उष्माघाताचा त्रास होत असल्यास डॉक्टरांना दाखवावे. घरीच उपचार करू नये.







