अमरावती: भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या एका (Navneet Rana) वक्तव्यामुळे राज्यातील (Asaduddin Owaisee) राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. काही दिवसांपूर्वी एका मौलानाच्या (Maharashtra Politics) वक्तव्याचा संदर्भ देत नवनीत राणा यांनी “जर ते 19 मुलं जन्माला घालत असतील, तर आपणही किमान 4 मुलं जन्माला घातली पाहिजेत,” असे आवाहन हिंदूंना केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या (Political News) प्रमाणावर व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी अमरावतीतील सभेत नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीका केली. (Latest Marathi News)

अमरावतीतील सभेत बोलताना ओवैसी म्हणाले होते की, “मोहन भागवत म्हणतात मुलं जन्माला घाला, नवनीत राणा म्हणतात 4 मुलं जन्माला घाला. मी सांगतो तुम्ही 8 मुलं जन्माला घाला, आम्हाला त्याचं काही देणंघेणं नाही. पण तुम्ही द्वेषाचं राजकारण करता.” अशा वक्तव्यांमुळे जनतेचं लक्ष महागाई, बेरोजगारीसारख्या मूळ प्रश्नांवरून हटवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
यानंतर नवनीत राणा यांनी ओवैसींना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, देशात लोकशाही बदलत चालली आहे, यावर ओवैसींनी बोलायला हवे. या देशात राहायचे असेल तर संविधानाला मानले पाहिजे. ओवैसी यांचे नागरिकत्व रद्द करून त्यांना पाकिस्तानला पाठवले पाहिजे, तिथे जाऊन 10 नाही तर 20 मुलं जन्माला घाला, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. ओवैसी संसद सदस्य असूनही संविधान मानत नाहीत, भारत माता की जय किंवा वंदे मातरम म्हणत नाहीत, मग या देशाबद्दल त्यांची भूमिका काय आहे, असा सवालही नवनीत राणा यांनी उपस्थित केला.
तसेच निवडणूक आयोगाने ओवैसी यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी आणि त्यांना पाकिस्तानला पाठवावे, असा हल्लाबोलही नवनीत राणा यांनी केला. आता या वक्तव्यावर असदुद्दीन ओवैसी काय प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.







