बीड: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणात नवे दावे पुढे येत असून वातावरण पुन्हा तापले आहे. या प्रकरणातील (Beed News) फरार आरोपी कृष्णा आंधळे तीन वेळा (Massajog News) गावी येऊन गेल्याचा गंभीर आरोप (Walmik Karad) दिवंगत सरपंचांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. त्यांनी ही (Dhananjay Munde) माहिती सीआयडीला दिल्याचेही सांगितले.

बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, “कृष्णा आंधळे मोबाईल वापरत नाही, त्यामुळे त्याचा मागोवा घेणे कठीण झाले आहे. मात्र त्याला अटक करणे अत्यावश्यक आहे. आमच्या कुटुंबाला त्याच्यापासून धोका आहे.” आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. दीड वर्ष उलटूनही कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या जामीन अर्जावर 26 तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याबाबत कॅव्हेट दाखल करण्यात आले असून न्यायालयात आपली बाजू ठामपणे मांडणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.
21 फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सरकारी पक्षाला सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या. आरोपी क्रमांक 3 ते 7 यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती बदलण्याबाबत केलेल्या अर्जावर सरकारी पक्षाकडून लेखी उत्तर सादर होणार आहे. विष्णू चाटेच्या जेल बदली अर्जावर आदेश येण्याची शक्यता आहे. आरोपी जयराम चाटेने नवीन वकील एम. के. वाघीरकर यांची नियुक्ती केली आहे.
लॅपटॉपची क्लोन कॉपी, फॉरेन्सिक अहवाल आणि पेन ड्राईव्हची माहिती अद्याप न मिळाल्याचे सांगत आरोपींच्या वकिलांनी साक्षीदार यादी स्वीकारू नये, अशी मागणी केली. तर सरकारी पक्षावर घाई केल्याचा आरोपही करण्यात आला.
प्रकरणातील गुंतागुंत, फरार आरोपी आणि न्यायालयीन लढाईमुळे जिल्ह्यातील हे खून प्रकरण अजूनही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. पुढील सुनावणी 6 मार्च रोजी होणार आहे.







