पुणे: टी-20 विश्वचषकाच्या ‘सुपर 8’ फेरीची सुरुवात टीम इंडियासाठी अत्यंत वाईट ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताला 76 धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. हा केवळ पराभव नाही, तर आतापर्यंत साखळी फेरीत भारतीय फलंदाजीतील ज्या त्रुटी विजयाच्या पडद्याखाली झाकल्या गेल्या होत्या, त्या दक्षिण आफ्रिकेने चव्हाट्यावर आणल्या आहेत.

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. भारताच्या धारदार गोलंदाजीमुळे आफ्रिकेची अवस्था 3 बाद 20 अशी झाली होती. मात्र, इथूनच सामन्याचे चित्र पालटले. डेवाल्ड ब्रेव्हिस (45 धावा) आणि अनुभवी डेव्हिड मिलर (63 धावा) या जोडीने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत 50 चेंडूत 97 धावांची वादळी भागीदारी केली. या जोडीने भारताला बॅकफूटवर ढकलले आणि आफ्रिकेने187 धावांपर्यंत मजल मारून दिली.
188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. परिणामी, संपूर्ण भारतीय संघ केवळ 111 धावांत परतला.
सामन्यानंतर बोलताना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने भारताचा पराभव ब्रेव्हिस आणि मिलर या दोघांनमुळे झाल्याचे सांगितले . मार्करम म्हणाला, “खेळपट्टीचा अंदाज घेऊन आमच्या फलंदाजांनी मधल्या षटकांत जी फटकेबाजी केली, तोच टर्निंग पॉईंट ठरला. सुपर 8 मध्ये प्रत्येक सामना महत्त्वाचा असताना, अशा प्रकारची फलंदाजी भारताला स्पर्धेबाहेर ढकलण्यास पुरेशी आहे. आगामी सामन्यांत भारताला आपल्या खेळात बदल करावा लागेल.







