पुणे: राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत (Gram Panchayat Election) जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 दरम्यान संपत आहे, तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक (Loni Kalbhor) निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील (Uruli Kanchan) राजकीय हालचालींना वेग आला असून पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि थेऊर या वेगाने वाढणाऱ्या गावांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. (Theur News)

ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 20 फेब्रुवारी 2026 पासून प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू होणार आहे. 7 एप्रिल 2026 रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर नागरिकांना हरकती नोंदवण्याची संधी मिळणार आहे. अंतिम प्रभाग रचना 4 मे 2026 रोजी जाहीर होईल.
लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि थेऊर या तिन्ही गावांचा गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकास झाला आहे. औद्योगिक वाढ, वाढती लोकसंख्या, नवीन गृहनिर्माण प्रकल्प आणि पायाभूत सुविधा यामुळे मतदारसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे या गावांमध्ये प्रभागांची फेररचना महत्त्वाची ठरणार आहे. स्थानिक पातळीवर कोणत्या वस्तीचा कोणत्या प्रभागात समावेश होणार, आरक्षणाची मांडणी कशी होणार आणि कोणत्या भागात नवीन राजकीय समीकरणे तयार होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग रचना तीन टप्प्यांत पार पडणार आहे. तहसीलदार 20 फेब्रुवारीपर्यंत नकाशे अंतिम करतील. त्यानंतर तलाठी आणि ग्रामसेवक 27 फेब्रुवारीपर्यंत प्रत्यक्ष पाहणी करून प्रभाग निश्चित करतील. जिल्हाधिकारी स्तरावर पडताळणी होऊन प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला जाईल.
7 एप्रिलला प्रारूप रचना जाहीर झाल्यानंतर 13 एप्रिलपर्यंत हरकती दाखल करता येतील. 21 एप्रिलपर्यंत सुनावण्या होऊन 28 एप्रिलपर्यंत अंतिम प्रस्ताव तयार केला जाईल.
लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि थेऊरमध्ये आगामी निवडणुकीपूर्वीच राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात झाली असून प्रभाग रचना हा पुढील राजकीय लढतीचा पाया ठरणार आहे.







