पुणे: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या (Vasant More) निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर झाला आणि या निकालाने राज्याच्या राजकारणात (Pune Mahapalika Result) मोठी उलथापालथ घडवून आणली. बहुतांश महापालिकांमध्ये भाजपा-शिंदे शिवसेना युतीने निर्विवाद (Pune Politics) वर्चस्व मिळवत सत्ता काबीज केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांमध्येही भाजपाने मोठा विजय नोंदवला. दुसरीकडे शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गटातील काही उमेदवार), मनसे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांना अपेक्षित यश मिळवता आलं नाही. (Latest Marathi News)

पुण्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असणारे आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते वसंत मोरे यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे उमेदवार व्यंकोजी खोपडे यांनी वसंत मोरे यांचा पराभव केला. विशेष म्हणजे वसंत मोरे यांच्यासोबतच त्यांचे चिरंजीव रुपेश मोरे यांनाही मतदारांनी नाकारलं. प्रभाग 40 (ड) मधून लढलेले रुपेश मोरे यांचाही पराभव झाला.
या पराभवानंतर वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली. मात्र, त्यांच्या पोस्टमधील शेवटच्या वाक्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. “चार वर्ष पुणे शहरात कोणतेही पद नसताना 2022 ते 2026 गरीब मायबाप जनतेचा आधार बनून होतो आणि आता तर 20 हजार 867 पीडित, शोषित, प्रामाणिक जनतेने आशीर्वाद दिला आहे, परिणाम तर भोगावे लागतील ना…” असं त्यांनी लिहिलं आहे.
या ‘परिणाम तर भोगावे लागतील ना…’ या वाक्यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. हा कुणाला दिलेला इशारा आहे का? की राजकीय संघर्षाची नवी दिशा सूचित करणारा संदेश आहे? याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
एकेकाळी पुण्याच्या राजकारणात प्रभावी भूमिका बजावणाऱ्या वसंत मोरे यांना मिळालेला हा धक्का ठाकरे गटासाठीही मोठा धक्का मानला जात आहे. बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये पुण्यातील सत्तासंघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.







