पुणे: राज्यातील महापालिका निवडणुकांच्या (Pune Politics) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वातावरण (Pune Mahapalika Nivadnuk) तापले आहे. एकीकडे बिनविरोध निवडून (Devendra Fadanavis) आलेल्या नगरसेवकांवरून वाद सुरू असतानाच, दुसरीकडे (Ajit Pawar) प्रचारात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील संघर्ष (Murlidhar Mohol) अधिक तीव्र होत आहे. भाजप नेत्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्वी केलेल्या आरोपांची आठवण करून दिली जात असल्याने राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. (Latest Marathi News)

पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने 125 जागा निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र सत्तेत मित्र पक्ष असलेले अजित पवार यांच्यामुळे भाजपसमोर आव्हान उभे राहिल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी जवळीक वाढवल्याने भाजपचे गणित बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मिशन 125 यशस्वी होईल का, याबाबत पक्षाच्या गोटात चिंता व्यक्त केली जात आहे.
खासगी आणि शासकीय सर्व्हेमधूनही भाजपला फटका बसण्याची चिन्हे दिसत असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील भाजप नेत्यांना कानउघडणी केल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे 2500 पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अनेक जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते डावलून नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आल्याने पक्षात नाराजी वाढली आहे.
या नाराजीमुळे काही बंडखोरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे भाजपच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम निकालांवर होऊ शकतो, असे बोलले जात आहे. सोमवारी रात्री कात्रज येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मूरलिधर मोहोळ यांनी अजित पवार यांचे नाव न घेता टीका केली. सभेनंतर मुख्यमंत्री फडणवीस, मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीत 165 जागांचा आढावा घेत कमकुवत प्रभागांवर तातडीने लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे.







