पुणे: पुण्यातील मुंढवा येथील 40 एकर जमीन (Pune Land Scam) विक्री प्रकरणावरून पुन्हा एकदा मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. माहिती अधिकार (Mundhwad Land Scam) कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या प्रकरणात (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे (Parth Pawar) पुत्र पार्थ पवार यांच्यावरही (Sheetal Tejwani) गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करत गंभीर आरोप केले आहेत. विजय कुंभार यांनी (Anjali Damania) सांगितले की, यापूर्वी पार्थ पवार यांच्या सहीचे पत्र समोर आले होते. मात्र (Pune News) पार्थ पवार यांनी हे पत्र आपल्या सहीचे नसल्याचा दावा केला होता. तरीही 25 मे 2021 रोजी हा व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून हा कथित घोटाळा सुरू असून, एकाच नोटरी व वकिलामार्फत कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हे सर्व प्रकार अजित पवार यांच्या माहितीत असून, राज्यातील मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री या प्रकरणात संरक्षण देत असल्याचा खळबळजनक दावा विजय कुंभार यांनी केला आहे. (Latest Marathi Breaking News)

सादर केले ठोस पुरावे
या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, मुंढव्याच्या जमिनीची पावर ऑफ अटॉर्नी उपलब्ध असून, त्यावर प्रत्येक पानावर पार्थ पवार यांची सही आणि फोटो आहे. ही पावर ऑफ अटॉर्नी 2021 मधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित कागदपत्रे ॲडव्होकेट तृप्ता ठाकूर यांच्याकडून पाठवण्यात आली असून, त्यामध्ये चॅटिंग, ईओडब्ल्यू अधिकाऱ्यांचे नंबर आणि अजित पवारांच्या पीएशी संबंधित संवाद असल्याचा दावाही त्यांनी केला.
पार्थ पवारांवर कारवाई का नाही?
अंजली दमानिया यांनी सांगितले की, हे सर्व पुरावे पोलिसांकडे देण्यात आले असतानाही पार्थ पवार यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. जर आजच अजित पवार यांचा राजीनामा घेण्यात आला नाही, तर उद्या पुण्यात जाऊन थेट पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. अजित पवार हे काही संत नाहीत, त्यांच्या कार्यालयातील किमान तीन अधिकारी या प्रकरणात सहभागी असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.







