पुणे: मित्र आणि मैत्रिणींनी एकत्र येऊन पार्टी (Pune Crime) केल्यानंतर दारूचे प्रमाण जास्त (Pune News) झाल्याने एका तरुणीला चालताही येत नव्हते. त्यामुळे तिच्या मैत्रिणींनी तिला तिच्या पीजीच्या पायऱ्यांपर्यंत आणून सोडले. मात्र याच परिस्थितीचा गैरफायदा घेत पीजी मालकाने तिच्याशी अभद्र वर्तन करत विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

याबाबत 24 वर्षांच्या एका तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिरुमला ऊर्फ रघुराव तिरुम लाय्या कोथा (वय 35, रा. बालाजीनगर, घोरपडी) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 12 डिसेंबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बालाजीनगर परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी एका खासगी ठिकाणी नोकरी करत असून ती बालाजीनगर येथील एका पीजीमध्ये वास्तव्यास आहे. घटनेच्या दिवशी फिर्यादी, तिच्या मैत्रिणी आणि आरोपी हे सर्वजण एकत्र दारू पीत होते. दारूचे प्रमाण अधिक झाल्याने तरुणीची अवस्था गंभीर झाली आणि तिला चालता येईना. त्यामुळे तिच्या मैत्रिणींनी तिला पीजीपर्यंत आणले. मात्र, तिला थेट खोलीत न नेता पीजीच्या पायऱ्यांवरच बसवून त्या निघून गेल्या.
तरुणी पायऱ्यांवर बसलेली असताना आरोपी तिरुमला कोथा तिच्या मागून आला आणि तिला मिठी मारली. त्यानंतर तिच्याशी अभद्र वर्तन करत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशी कृती केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साळवे करत आहेत.






