पुणे: ऑपरेशन सिंदुरच्या पहिल्याच (Prithviraj Chavan) दिवशी भारताचा पराभव झाला, असे वक्तव्य करत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे (Operation Sindoor) ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा वाद ओढवून घेतला आहे. पुण्यात आज माध्यमांशी बोलताना त्यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात (Narendra Modi) खळबळ उडाली आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत त्यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधताना पाकिस्तानसोबत सुरू केलेले युद्ध ही मोठी घोडचूक असल्याचे म्हटले. भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानपेक्षा 10 पट मोठी असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक युद्ध थांबवण्याचा निर्णय का घेतला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. युद्धाच्या पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाला, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. (Maharashtra Politics)
पहिल्याच संघर्षात हार पत्करली
चव्हाण यांनी असा आरोप केला की पाकिस्तानने भारतीय विमानं पाडली. 7 मे 2025 रोजी अवघ्या अर्ध्या तासाच्या पहिल्या हवाई संघर्षात भारताला हार पत्करावी लागली, असे त्यांनी सांगितले. लोक हे मान्य करतील की नाही, याची कल्पना नाही, पण त्या दिवशी भारतीय विमानं उडवण्यातच आली नाहीत, असा दावा त्यांनी केला. हवाई तळावरच विमानं थांबवण्यात आली होती. जर ग्वालियर, भटिंडा किंवा सिरसा येथून विमानं उडवण्यात आली असती, तर ती पाकिस्तानकडून पाडली जाण्याची शक्यता अधिक होती, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोणता आणि कसला दबाव आहे, याचा शोध घेतला पाहिजे, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेचा दबाव असल्याचा आरोप केला. भारताचे परराष्ट्र धोरण कमकुवत ठरत असल्याचा आरोप करत, या आघाडीवर मोदी सरकार अपयशी ठरल्याचे त्यांनी म्हटले.
संतापाची लाट
उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी 19 डिसेंबर रोजी पृथ्वीराज चव्हाण यांनी भारताचा पंतप्रधान बदलणार असून मराठी माणूस पंतप्रधान होईल, असा दावा केला होता. त्या दाव्यावर ते आजही ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र ऑपरेशन सिंदुर बाबत केलेल्या ताज्या वक्तव्यामुळे आता राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.







