मुंबई: राज्यसभेसाठी भारतीय जनता पक्षाने (Rajya Sabha) आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. भाजपने विनोद तावडे, रामदास आठवले, माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. या निवडीतून भाजपने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या बड्या नेत्यांना संधी दिल्याचे स्पष्ट होते.

भाजपकडे सध्या 132 आमदारांचे संख्याबळ असून 25 नावांमधून केंद्राने 4 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांच्या तीन जागा सहज निवडून येऊ शकतात, तर चौथ्या जागेसाठी मित्रपक्षांची मदत लागणार आहे.
-
विनोद तावडे: तावडेंना संसदेत पाठवून भाजपने त्यांच्या अनुभवाचा सन्मान केला आहे.
-
रामदास आठवले: दलित मतांचे समीकरण आणि मित्रपक्षाला सोबत ठेवण्यासाठी आठवलेंची उमेदवारी महत्त्वाची मानली जाते.
-
माया ईवनाते: नागपूरच्या माजी महापौर आणि भाजपचा आदिवासी चेहरा असलेल्या ईवनाते यांना संधी देऊन विदर्भातील आदिवासी मतांवर पकड मिळवण्याचा हा प्रयत्न आहे.
-
रामराव वडकुते:धनगर समाजाचे नेतृत्व करणारे वडकुते यांना उमेदवारी देऊन पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ओबीसी मतदारांना साद घालण्यात आली आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये (MVA) पेच कायम होता. शरद पवार स्वतः राज्यसभेसाठी इच्छुक असताना शिवसेनेने (UBT) या जागेवर दावा केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, चर्चेनंतर अखेर शिवसेनेने शरद पवारांना पाठिंबा देत एकी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.







