मुंबई: मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Ajit Pawar Plane Crash ) राष्ट्रवादीच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण (Ajit Pawar Death) निर्माण झाले. रोहित पवार (Rohit Pawar) आणि अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिसांशी थेट चर्चा केली. अपघातामागे घातपाताचा संशय असल्याचा दावा करत त्यांनी पुरावे उपलब्ध असूनही एफआयआर नोंदवला जात नसल्याचा आरोप केला. (Breaking News)

आमदारांसोबत संदीप क्षीरसागर आणि त्यांचे वकील उपस्थित होते. कार्यकर्त्यांना पोलिसांनी केबिनबाहेर थांबवले होते. पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कायद्याच्या चौकटीत योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, केवळ तक्रार अर्ज नोंदवून भागणार नाही, तर डीजीसीए आणि VSR कंपनीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी आमदारांची ठाम मागणी होती.
रोहित पवार यांनी डीजीसीएच्या अहवालात कंपनीच्या निष्काळजीपणाचे मुद्दे समोर आल्याचा दावा करत पोलिसांवर विलंबाचा आरोप केला. अमोल मिटकरी यांनीही चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा होत असल्याचे सांगितले. काही वेळ शाब्दिक वाद झाल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, पोलिस सूत्रांनी सांगितले की तक्रारीतील मुद्द्यांचा कायदेशीर अभ्यास करूनच पुढील पावले उचलली जातील. विमान अपघातासारख्या संवेदनशील प्रकरणात तांत्रिक आणि कायदेशीर तपास पूर्ण झाल्यानंतरच गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेतला जातो, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
या घटनेमुळे राजकीय वातावरण अधिक तापले असून, पुढील काही दिवसांत तपासाची दिशा आणि पोलिसांची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






