धाराशिव: बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या (Sai Kala Kendra) आत्महत्येच्या घटनेने राज्य (Dharashiv News) हादरलेले असतानाच, धाराशिव जिल्ह्यातही (Dharashiv Crime) असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धाराशिवमधील साई कलाकेंद्रात काम करणाऱ्या एका नर्तकीच्या प्रेमात पडलेल्या 25 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अश्रूबा अंकुश कांबळे असे या तरुणाचे नाव असून तो विवाहित असल्याची माहिती समोर आली आहे. (Breaking News)

लग्न झालेलं तरीही नर्तिकेवर प्रेम
मिळालेल्या माहितीनुसार, अश्रूबा कांबळे हा धाराशिव तालुक्यातील रुई ढोकी येथील रहिवासी होता. त्याचे लग्न झालेले होते आणि पत्नीही घरी होती. तो येडशी परिसरातील यशोदा स्टोन क्रशरवर मजूर म्हणून काम करत होता. काही अंतरावर असलेल्या साई कलाकेंद्रात काम करणाऱ्या पूजा उर्फ आरती वाघमारे हिच्याशी त्याची ओळख झाली आणि हळूहळू दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. हे नाते सुमारे 5 वर्षांपासून सुरू होते. (Marathi News)
नर्तकी सतत घरी यायची
विवाहित असूनही दुसऱ्या तरुणीशी असलेले संबंध आणि सततचे वाद यामुळे घरात तणाव वाढला होता. पूजा ही वारंवार अश्रूबाच्या घरी येत असल्याने वाद होत होते. या सर्व प्रकारांना कंटाळून अखेर अश्रूबाची पत्नी घर सोडून माहेरी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कुटुंबियांच्या आरोपानुसार, पूजा हिच्याकडून अश्रूबाकडे सतत पैशांची मागणी केली जात होती. त्याने वेळोवेळी तिला रोख पैसे, घरातील सोन्याची नाणी दिली. तसेच त्याने स्वतःची आरडी मोडून तिच्यासाठी पैसे दिले, मात्र तरीही पैशांची मागणी थांबत नव्हती. या कारणांवरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. (Marathi Batmya)
कुटुंबीयांचा गंभीर आरोप
अखेर या सततच्या मानसिक तणावाला कंटाळून अश्रूबा कांबळे याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा कुटुंबियांनी केला असून त्यांनी न्यायाची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी नर्तकी पूजा हिला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.







