पुणे: हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क हे (Pune News) देशातील महत्त्वाचे आयटी (Hinjawadi News) आणि सॉफ्टवेअर निर्यात केंद्र मानले जाते. मात्र, गेल्या (Pune Leopard Attack) काही काळापासून विविध (Leopard Attack) कारणांमुळे हे आयटी पार्क चर्चेत आहे. आता येथे काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे परिसरात बिबट्यांचा वावर वाढत असून, त्याचा थेट परिणाम हिंजवडी आयटी पार्क परिसरातही दिसून येत आहे. आयटी पार्कमध्ये बिबट्याचा शिरकाव झाल्याचे समोर आल्यानंतर कंपन्यांमध्ये चिंता वाढली आहे. (Breaking News)

विशेष सुरक्षा सूचना जाहीर
हिंजवडी आयटी पार्कमध्ये सुमारे 5 लाख आयटी कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन काही मोठ्या आयटी कंपन्यांनी तातडीने पावले उचलली आहेत. एका नामांकित आयटी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुरक्षा सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनांनुसार संध्याकाळी, रात्री आणि पहाटेच्या वेळी कर्मचाऱ्यांनी एकटे बाहेर पडू नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. या वेळेत रस्त्यांवर रहदारी कमी असते आणि अंधारामुळे दृश्यमानताही कमी होते, त्यामुळे धोका वाढतो, असे कंपनीने नमूद केले आहे. (Marathi News)
नागरिकांना आवाहन
कंपनीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये रात्री आणि पहाटे एकटे घराबाहेर पडणे टाळावे, कार्यालयीन वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, निर्मनुष्य ठिकाणी एकटे जाणे टाळावे, जास्त उजेड आणि गर्दी असलेल्या भागात थांबावे, झाडे, जंगल किंवा सुनसान रस्त्यांपासून दूर राहावे, तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोणताही संशयास्पद प्राणी दिसल्यास तातडीने सुरक्षा कर्मचाऱ्यांना कळवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
जितेंद्र डुडी यांची माहिती
दरम्यान, जुन्नर परिसरात बिबट्यांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्यावर उपाययोजना करण्यासाठी 13 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून पिंजऱ्यांच्या मदतीने आतापर्यंत 68 बिबट्यांना वन विभागाने जेरबंद केले आहे. कमी कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात बिबट्यांना पकडण्यात यश आल्याने मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले आहे.
सतर्क राहा
जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जुन्नर, ओतूर, शिरूर, घोडेगाव, मंचर, राजगुरुनगर आणि चाकण या भागांचा समावेश होतो. 2025-26 या कालावधीत बिबट हल्ल्यात 5 नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यांना 65 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तसेच 5 नागरिक जखमी झाले असून त्यांना 2 लाख 18 हजार 964 रुपये भरपाई देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.






