पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरात शिधापत्रिका (Pimpri-Chinchwad News) पडताळणी मोहिमेदरम्यान मोठी कारवाई झाली असून चुकीची माहिती, अपूर्ण कागदपत्रे (Pune News) आणि विसंगती आढळल्यामुळे तब्बल सव्वा दोन लाख नागरिकांचे रेशन बंद करण्यात आले आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने राबवलेल्या या मोहिमेला आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. त्यामुळे शहरातील रेशनकार्डधारकांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. (Ration Card)

आजपर्यंत एकूण 22,696 शिधापत्रिका अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. यामध्ये पिंपरी विभागातील 72,256, चिंचवडमधील 82,569 आणि भोसरीतील 67,772 नागरिकांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत. पडताळणीदरम्यान अनेक कुटुंबांनी त्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे मान्य केले, तर काहींच्या कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती, चुकीचे पत्ते आणि अपूर्ण नोंदी आढळल्या. शहराबाहेर स्थलांतर झालेले असूनही अनेकांची शिधापत्रिका सक्रिय असल्याचे समोर आले. या सर्व कारणांमुळे प्रशासनाने संबंधित नागरिकांना योजनेबाहेर केले आहे.
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, अपात्र लाभार्थ्यांना वगळल्यामुळे खरोखर गरजू कुटुंबांना अधिक धान्याचा वाटा मिळणार आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेत पारदर्शकता येईल आणि पात्र लाभार्थ्यांना योग्य तो लाभ मिळेल, असा दावा करण्यात आला आहे. ज्यांना आपल्या शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा वाटत असेल, त्यांनी जवळच्या रेशन दुकानात जाऊन आवश्यक कागदपत्रांसह पुनर्पडताळणीसाठी अर्ज करावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : पुण्यात महिलेच्या बॅगमध्ये सापडलं असं काही की पाहून पोलिसही ‘चक्रावले’; चिप्सच्या पाकिटात चक्क सापडलं…
दरम्यान, ज्या नागरिकांनी अद्याप E-KYC पूर्ण केलेले नाही त्यांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. 31 डिसेंबरपूर्वी E-KYC न केल्यास तुमचे रेशनकार्डही बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पात्र नागरिकांना वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







