पिंपरी-चिंचवड: आळंदी येथे श्री संत (Pimpri-Chinchwad Crime) ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या (Pune Alandi) दोन वारकऱ्यांचे (Pune News) अपहरण करून (Pune Crime) त्यांच्याकडून पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी 9 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास आळंदीतील चाकण चौक परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका महिलेसह दोन संशयितांना अटक केली असून अपहृत वारकऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

जबरदस्तीने गाडीत बसवलं
दगडू शिवराम गायकवाड (वय 62) आणि त्यांचे मित्र प्रशीक आंबोरे (वय 60) अशी अपहरण झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत. दर्शन घेतल्यानंतर हे दोघे आळंदी मंदिराजवळील चाकण चौक परिसरात आले असताना मोटारीतून आलेल्या काही जणांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी दोघांचे मोबाईल फोन काढून घेतले आणि त्यांना एका अज्ञात ठिकाणी डांबून ठेवले. (Breaking News)
खंडणीची मागणी
यानंतर अपहरणकर्त्यांनी दोघांकडे 2 लाख रुपये खंडणीची मागणी करत धमकी दिली. सुदैवाने, या दोघांपैकी एक वारकरी संधी साधून पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान, अपहृत वारकरी दगडू गायकवाड यांचे पुत्र सदानंद गायकवाड (वय 35, रा. रिसोड, जि. वाशीम) यांना खंडणीसाठी फोन आला. वडिलांचे अपहरण झाल्याचे समजताच त्यांनी तात्काळ आळंदी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
लोकेशनच्या आधारे संशयितांचा शोध
सदानंद गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सचिन सुरेश मोरे (वय 30, रा. चऱ्होली खुर्द, खेड) आणि चऱ्होली खुर्द येथील एका 40 वर्षीय महिलेला अटक केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढला. पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे दुसऱ्या वारकऱ्याचीही सुरक्षित सुटका करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.







