नवी दिल्ली: बांगलादेशात झालेल्या 12 फेब्रुवारीच्या (Bangladesh News) निवडणुकीत ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’ने (BNP) मिळवलेला दणदणीत विजय हा केवळ सत्तेचा बदल नसून, समीकरणे बदलणारा ठरणार आहे. शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारत-बांगलादेश संबंध चांगले होते. सुरक्षा, व्यापार आणि दहशतवाद रोखण्यासाठी हसीना यांनी भारताला मोलाची साथ दिली. मात्र आता 17 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर तारिक रहमान आता पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. मात्र, त्यांच्या या विजयाने भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात चिंतेचे ढग दाटले आहेत.

मात्र, बीएनपीने दिलेला “मित्र व्हा, मास्टर नाही” या नाऱ्याचा अर्थ असा की, ढाका आता दिल्लीच्या प्रभावातून बाहेर पडून चीन आणि पाकिस्तानशी अधिक जवळीक साधण्याची शक्यता आहे.
जमातचा इतिहास नेहमीच कट्टर भारतविरोधी राहिला आहे. दरम्यान, या सत्तेत बीएनपीची सहयोगी असलेल्या ‘जमात-ए-इस्लामी’ला ७० जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, आता बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि सीमेवरील घुसखोरी पुन्हा ऐरणीवर येऊ शकते.
तणाव असला तरी तारिक रहमान यांना आर्थिक वास्तवाची जाणीव ठेवावी लागेल. व्यापार, वीज पुरवठा आणि विशेषतः तीस्ता नदी पाणीवाटपासाठी त्यांना भारताची मदत लागणारच आहे. त्यामुळेच, भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनी आता थेट बीएनपीशी संवाद वाढवण्यास सुरुवात केली आहे. रहमान यांचा विजय भारतासाठी चांगला मानला जात नसला, तरी संबंध चांगले करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.







