पुणे: गेल्या काही दिवसांपासून (Sunstroke Symptoms) राज्याच्या तापमानात मोठी वाढ झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ झाली आहे. कडक उन्हामुळे केवळ अंगाची लाहीलाही होत नसून, उष्माघाताचा धोकाही वाढला आहे. जेव्हा वातावरणातील तापमान शरीराच्या नैसर्गिक तापमानापेक्षा जास्त वाढते, तेव्हा शरीराला स्वतःला थंड ठेवणे कठीण जाते. यामुळे चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या आणि अत्यंत थकवा जाणवू लागतो. यालाच आपण, उष्माघात म्हणतो.

१. जास्त पाणी पिणे सर्वात महत्त्वाचे:
-
तहान लागलेली नसली तरीही दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या.
-
लिंबू सरबत, ताक, कोकम सरबत किंवा शहाळ्याचे पाणी यांसारख्या नैसर्गिक पेयांचा आहारात समावेश करा.
-
अल्कोहोल, चहा आणि कॉफी टाळा, कारण यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.
२. घराबाहेर पडताना घ्यायची काळजी:
-
दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो कडक उन्हात बाहेर पडणे टाळा.
-
बाहेर जाताना हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरा.
-
डोक्यावर टोपी, छत्री किंवा रुमाल ठेवा आणि डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस वापरा.
३. आहार कसा असावा?
-
उन्हाळ्यात जड आणि तेलकट अन्न खाणे टाळा.
-
कलिंगड, काकडी, संत्री यांसारखी जास्त पाणी असलेली फळे खा.
-
शिळे अन्न खाणे टाळा, कारण उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होऊन विषबाधा होण्याची शक्यता असते.







