पुणे: राज्यातील 29 (Ajit Pawar) महानगरपालिकांसाठी आज (Pune Mahapalika Election) मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच, उद्या 16 जानेवारी रोजी या निवडणुकांचे (Baramati ZP Election) निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत (Baramati News) समिती निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडत बारामतीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या या बैठकीत अजित पवारांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सविस्तर माहिती देत कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आवाहन केले. (Latest Marathi News)

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र 50 टक्के आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी काही जिल्ह्यांमध्ये अडचणी असल्याने पहिल्या टप्प्यात 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार 16 ते 21 जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 22 जानेवारी रोजी छाननी, 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. अवघ्या आठ दिवसांच्या प्रचारानंतर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन सर्व निकाल जाहीर केले जातील.
अजित पवार यांनी बारामती आणि माळेगाव नगरपरिषद निवडणुकांतील यशाचा उल्लेख करत कार्यकर्त्यांचे आभार मानले. बारामती नगरपरिषदेत 41 पैकी सुमारे 35 जागा राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी जिंकल्या असून अपक्ष निवडून आलेल्या तीन नगरसेवकांनीही सत्ताधारी गटाला पाठिंबा दिला आहे.
उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी पाच वर्षांत पाच जणांना संधी देण्याचे धोरण जाहीर केले. स्वीकृत नगरसेवकांच्या बाबतीत नवीन नियम लागू झाल्याचे सांगत, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना संधी देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राच्या सत्ताकेंद्राची चाचणी असून, या निवडणुकांमधून आगामी विधानसभा आणि लोकसभा रणनितीची दिशा ठरणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही आठवड्यांत राज्यात राजकीय वातावरण अधिक तापलेले दिसणार आहे.







