हवेली (पुणे): हवेली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती (Haveli News) सार्वत्रिक निवडणूक शांततेत, पारदर्शकतेने व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी (Maharashtra ZP Election) हवेली जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून EVM (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) व्यवस्थापनासाठी सर्वंकष व काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक टप्प्यावर जबाबदाऱ्या निश्चित करून कार्यवाही राबविण्यात येत आहे.

हवेली तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली EVM व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात आले आहे. सहाय्यक निवडणूक अधिकारी अर्चना निकम व तृप्ती कोलते संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवत आहेत. EVM व्यवस्थापन विभागात सचिन आखाडे, गजानन किरवले, अविनाश तोरणे, माधुरी माने, भूमेश मसराम, साहिर सय्यद, सचिन शेळके, ज्ञानेश्वर मानकर, अश्विनी कुलकर्णी,सुविद्य पवार व शरद कारसुलकर हे अधिकारी व कर्मचारी सक्रियपणे कार्यरत आहेत. तसेच माध्यम अधिकारी प्रा. योगेश हांडगे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून समन्वय साधत आहेत.
EVM प्रक्रियेमध्ये First Randomization, Second Randomization, FLC (First Level Checking), EVM Scanning, Commissioning, Mock Poll आदी सर्व टप्पे निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार पार पाडण्यात आले आहेत. प्रत्येक टप्प्यावर अधिकृत अधिकारी व प्रतिनिधींची उपस्थिती सुनिश्चित करण्यात आली आहे.
EVM Strong Room व्यवस्थापनासाठी डबल लॉक सिस्टीम, २४ तास CCTV निगराणी, अग्निशमन यंत्रणा, वीजपुरवठा बॅकअप तसेच कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. Strong Room परिसरात अनधिकृत प्रवेशास सक्त मनाई करण्यात आली आहे.
मतदानाच्या दिवशी कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवू नये, यासाठी राखीव (Reserve) EVM मशीनचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रावर मशीन बिघाड किंवा तांत्रिक समस्या आढळल्यास तात्काळ राखीव EVM मशीन पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली असून, यासाठी स्वतंत्र तांत्रिक पथके व वाहन व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहेत.
मतदानानंतर वापरलेली EVM यंत्रे सुरक्षितरीत्या Strong Room मध्ये जमा करून सील करण्यात येणार असून, संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी व अधिकृत नोंदणी करण्यात येणार आहे. हवेली जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, अधिकारी, कर्मचारी, तांत्रिक पथके व राखीव EVM व्यवस्थेमुळे हवेली जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह, सुरक्षित व पारदर्शकपणे पार पडेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.






