पुणे: ऑनलाइन टॅक्सी किंवा (Pune Crime) रिक्षा बुकिंग रद्द केल्यावर दंड (Pune News) आकारला जातो, हे अनेकांना माहिती आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील आंबी परिसरात केवळ रिक्षा बुकिंग रद्द केल्याच्या रागातून एका तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण व खंडणीची मागणी केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

जबरदस्ती रिक्षात बसवलं
मिळालेल्या माहितीनुसार, सुमीत नावाचा 21 वर्षीय विद्यार्थी ऑनलाइन रिक्षा बुक करत होता. काही कारणांमुळे त्याने रिक्षा बुकिंग रद्द केले. याच गोष्टीचा राग मनात धरून तीन तरुणांनी सुमीतला अडवले. रिक्षा का रद्द केली, असा जाब विचारत त्यांनी त्याच्याशी वाद घातला. वाद वाढल्यानंतर या तिघांनी सुमीतला जबरदस्तीने रिक्षात बसवले आणि त्याचे अपहरण केले. (Breaking News)
मारहाण अन् खंडणी
अपहरणानंतर सुमीतला वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. या दरम्यान त्याला मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. भीतीच्या वातावरणात सुमीतने प्रसंगावधान राखत कसा तरी स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर त्याने थेट तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे येथे जाऊन घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला.
गुन्हा दाखल, तपास सुरु…
सुमीतच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मिथुन शेळके, साहिल वारिंगे आणि पवन पुयाद या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपहरण, मारहाण आणि खंडणी मागणे अशा गंभीर कलमांखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास केला जात आहे.
केवळ ऑनलाइन रिक्षा बुकिंग रद्द केल्यावरून असा गंभीर प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा घटनांमुळे ऑनलाइन सेवा वापरण्याबाबतही प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.






