पुणे: गेल्या सहा दिवसांपासून मान्सूनचे वारे स्थिर असल्याने मान्सूनचा वेग सध्या मंदावला आहे, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. यामुळे मान्सूनचा पुढचा प्रवास कधी सुरु होणार याची वाट पहिली जात आहे. स्थिर वाऱ्यांमुळे मान्सूनचा वेग कमी झाला आहे, ज्यामुळे मान्सून एका जागी स्थिरावला आहे. IMD परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि मान्सूनच्या गतीबद्दल अपडेट्स देत आहे. याचा परिणाम महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागांवर याचा परिणाम होऊ शकतो.

महाराष्ट्रात मान्सून वेळेआधी दाखल झाला होता. मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली, दरम्यान, सध्या पावसाचा जोर ओसरला असून मान्सून एका जागी स्थिरावल्यामुळे राज्यात मान्सूनची एन्ट्री कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
सामान्यपणे सात जूनच्या आसपास मान्सून राज्यात दाखल होतो, यंदा 25 मे रोजीच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झाले होते. शेतकरी सध्या पीक पेरणी करण्याच्या तयारीत असून पावसाने हूल दिल्यास राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. दरम्यान, पुढील 10 ते 12 जूनपर्यंत पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले आहे.







