अक्षय टेमगिरे
Shirur News : शिरूर, (पुणे) : शिरूर तालुक्यातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे आणि अंमली पदार्थांच्या विळख्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळुंज यांनी पुकारलेल्या ऐतिहासिक लढ्याला अखेर यश आले आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्वतः आंदोलनस्थळी भेट देऊन दिलेल्या सकारात्मक आश्वासनांनंतर 9 दिवसांपासून सुरू असलेले हे सत्याग्रह आंदोलन गुरुवारी (ता. 23) रात्री उशिरा स्थगित करण्यात आले.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी गुरुवारी रात्री उशिरा आंदोलनस्थळी भेट देत सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळुंज यांच्यासोबत सुमारे दोन तास सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर दिलेल्या सकारात्मक आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, घोडनदी वकील संघटनेचे अध्यक्ष उदय सरोदे, अभिषेक बाफना, किरण कुरंदळे, ज्ञानेश्वर कुरंदळे आदी उपस्थित होते. Shirur News

या प्रकरणाची दखल राज्याच्या अपर मुख्य सचिव गृह मनीषा पाटणकर तसेच पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनीही घेतल्याची माहिती मिळाली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस दल सज्ज आहे. जनतेच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करत अवैध धंद्यांवर कठोर पावले उचलली जातील. नशामुक्ती मोहिम सातत्याने राबवली जाईल असे स्पष्ट करत संदीप सिंह गिल्ल यांनी शिरूर पॅटर्न संपूर्ण पुणे ग्रामीणसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगितले. Shirur News
शिरूर तालुक्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विशेष कृती आराखडा, स्वतंत्र पथके व फ्लाइंग स्कॉडमार्फत सातत्यपूर्ण कारवाई, अवैध धंद्यांत सहभागी आढळणाऱ्या अधिकारी अन् कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असुन एम डी सह अमली पदार्थांविरोधात तीव्र मोहीम, सर्व कारवायांचा सखोल तपास व व्यापक मोहीम, शाळा-महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती जनजागृती समुपदेशन व युवक मेळावे, वाहनांवर लावण्यात येणाऱ्या आमदार खासदार नावाच्या बेकायदेशीर स्टिकर्स व राज्यचिन्हांचा गैरवापर रोखण्यासाठी विशेष कारवाई Shirur News
चर्चेतून सकारात्मक निर्णय
चर्चेदरम्यान आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या सर्व मागण्यांवर पोलिस अधीक्षकांनी गांभीर्याने विचार करून आवश्यक ती कार्यवाही लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवरील कारवाईसाठी पुरावे सादर झाल्यानंतर निष्पक्ष चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. Shirur News
निलेश वाळूंज म्हणाले, “ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन हा लढा उभारला. समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा मिळाल्यामुळे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली ही समाधानाची बाब आहे. पुढील काळातही समाजहितासाठी पाठपुरावा सुरू राहील. Shirur News







