पुणे : राज्यामध्ये दरवर्षी डेंग्यूमुळे होणारे मृत्यू थांबवण्यासाठी भारत स्वदेशी लस तयार करीत आहे.भारत आपली पहिली स्वदेशी टेट्राव्हॅलेंट डेंग्यू लस ‘डेंगी ऑल’ विकसित करत आहे.पॅनेसिया बायोटेक आणि आयसीएमआरच्या सहकार्याने ही लस सध्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीमध्ये आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये ही लस खूप प्रभावी ठरली आहे.पुढील वर्षापर्यंत भारतात डेंग्यूची स्वदेशी लस येण्याची शक्यता आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी संचालक बलराम भार्गव यांनी कोलकाता येथील सायन्स सिटीमध्ये लसीवर आयोजित एका कार्यक्रमात डेंग्यू लसीबद्दल मोठी माहिती दिली आहे . यामुळे लवकरच लोकांना डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी लस मिळू शकेल, अशी आशा निर्माण झाली आहे. ही लस आयसीएमआर आणि पॅनेसिया बायोटेक यांनी संयुक्तपणे तयार केली आहे. या लसीचे आतापर्यंत 10,000 हून अधिक लोकांवर यशस्वी परीक्षण झाले आहे.
या लसीची चाचणी देशभरातील 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील केंद्रांवर घेतली जात आहे. यामध्ये 10335 हून अधिक निरोगी लोकांचा समावेश करण्यात आला आहे. पुढच्या वर्षापर्यंत लवकरच भारताची स्वदेशी लस उपलब्ध होणार असून या लसीच्या आगमनाने लोकांना डेंग्युपासून स्वतःचे संरक्षण करण्यास मदत मिळणार आहे.