सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
पुरंदर: पुरंदर तालुक्यात दुष्काळाच्या छाया गंभीर बनत चालल्या आहेत. त्यातच पाण्याचा प्रश्न तर ग्रामीण भागात चांगलाच भेडसावत आहे. ग्रामीण भागात सध्या तरी 10 टँकरद्वारे 11 गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.यामध्ये पिसे, सोनोरी, झेंडेवाडी, वाल्हे, नायगाव, पूर पोखर, वागदरवाडी, राजुरी, सिंगापूर, पोंढे, साकुर्डे या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर गुरोली, एखतपुर, निळूज, भिवडी, नायगाव, दौंडज, वाळुंज, खानवडी या गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव हे प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. ते मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. पाच गावांचे प्रस्ताव हे प्रलंबित आहेत.
दिवे प्रादेशिक योजनेची पाईपलाईन फुटल्यामुळे, योजना बंद असून, दिवे, (वाड्यावस्त्यात्यावर) सोनोरी, वनपुरी,उदाची वाडीं गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळेच अनेक गावांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे टँकरची मागणी ही वाढत चालली आहे. त्यासाठी प्रस्ताव आले की, लगेच सुविधा या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये शासनाकडे पाठवले जाणार आहेत. पा
पाण्याचा प्रश्न त्वरित सोडवला जाणार आहे.
सचिन घुबे, पाणीपुरवठा उप अभियंता, पुरंदर पंचायत समिती सासवड