पुणे: मुंबई, पुणे, अहिल्यानगर येथे पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे, भारतीय हवामान खात्याने तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. रहिवाशांना उष्णतेशी संबंधित आजार टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेदरम्यान आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने रहिवाशांना केले आहे. नागरिकांना उष्णतेशी संबंधित आजारांच्या लक्षणांबद्दल जागरूक राहण्याचा आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
पुण्यात उन्हाच्या तीव्र झळा सध्या जाणवत आहेत. पुण्यातील तापमानाने विदर्भालाही मागे टाकले आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान वाढ आणि अवकाळी पावसाचा खेळ सुरु आहे. मार्च महिन्यापासूनच उष्णतेची तीव्रता वाढली आहे. अवकाळी पावसामुळे एक आठवडा हवेत गारवा निर्माण झाला होता. सध्या सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असते.