भिगवण, पुणे : कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भिगवण आणि भिगवण बसस्थानक भिगवण यांच्या संयुक्त विद्यमाने भिगवण बसस्थानक परिसरात “मराठी भाषा दिनाच्या” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी “मराठी भाषा दिन” गौरव दिन म्हणून साजरा व्हावा असे प्रतिपादन डॉ अनिल बनसोडे यांनी केले.
मराठी भाषेला गेल्या वर्षी नुकताच ‘अभिजात भाषेचा दर्जा’ मिळाला आहे. अनुदान देऊनही उपयोग नाही उत्तम मराठी शिकवणारे, म्हणजे मराठी भाषा नव्हे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण हा जो अत्यंत कळीचा मुद्दा आहे त्यावर अजूनही अंमलबजावणीच्या पातळीवर खूपच अनास्था आहे. आपण सगळ्यांनी मिळून यात लक्ष घातलं तर भौतिक शास्त्र रसायनशास्त्र म्हणजेच विज्ञान सामाजिक शास्त्र यांचं भाषांतर अर्थात यातून आलेले ज्ञान आणि संशोधन याचं अनुवादित करून भाषा समृद्ध केली पाहिजे. ज्ञान समृद्ध केले पाहिजे. ज्ञाननिर्मिती केली पाहिजे. तर आपल्याकडे साहित्य क्षेत्रात नोबल प्राइजेस मिळतील.” असे प्रतिपादन डॉ अनिल बनसोडे, सहयोगी प्राध्यापक, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भिगवण यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.
या समारंभाला कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भिगवण येथील प्रा. समीर बळे, प्रा. धनाजी मत्रे, प्रा. सारिका पाटील, सोमनाथ कुताळ, बसस्थानक नियंत्रक तसेच निकिता जाधव, साक्षी खरात, शिवानी साठे आणि बहुसंख्य प्रवाशी उपस्थित होते.
” प्रांत निहाय भाषा सुद्धा महत्त्वाच्या आहेत. काही कोसांवर भाषा बदलत जाते तिचा बोलण्याचा लहेजा बदलतो हे मान्य करावंच लागेल, आणि त्यातूनच भाषा समृद्ध होत राहील.” असे प्रा. धनाजी मत्रे मार्गदर्शन करताना म्हणाले.
“मुळात भाषेचा आग्रह सातत्याने पाहिजे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे आपल्या भाषेवर केवढा परिणाम झालाय.आत्ता ही मुलं इंग्रजी माध्यमातून शिकून मराठी माध्यमात येतात. त्यांना ना धड मराठी, ना इंग्रजी, ना आणखी कुठली भाषा. मराठीतून अर्ज करता न येणं किंवा इंग्रजीतून स्वतःचा नंबर न लिहिता येणे हे आपल्या शिक्षण क्षेत्राचे दुर्दैव होय. आणि म्हणून मराठी माध्यमांच्या शाळा या निमित्ताने वाढल्या पाहिजेत नुसत्या वाढवून उपयोग नाहीत त्यांना अनुदान दिले गेली पाहिजे.” असे प्रा. सारिका पाटील मार्गदर्शन करताना म्हणाल्या.
श्री सोमनाथ कुताळ, बसस्थानक नियंत्रक यांनीही आपल्या मनोगतात सर्व प्रवाशांना मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.समीर बळे यांनी केले तर निकिता जाधव हिने आभार व्यक्त केले.