छ.संभाजीनगर: खुलताबाद येथील मुघल सम्राट औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेल्या तणावामुळे राष्ट्रीय तपास संस्था छ.संभाजीनगरात दाखल झाली आहे. चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) एक पथक बुधवारी छ.संभाजीनगर पोहोचले असून परिस्थीचा आढावा घेत आहे. पथकाकडून खुलताबाद परिसराची आणि कबरीची पाहणी करण्यात येत आहे. राज्यात नागपूर येथे १७ मार्च रोजी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन दंगलही झाली आहे. नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर औरंगजेबाची कबर झाकून ठेवण्यात आली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून छ.संभाजीनगरसह जालना, परभणी येथेही हिंसाचार उफाळण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागपूर हिंसाचार प्रकरणात सायबर पोलिसांनी फहीम खान याच्यासह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत 90 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीवरून छ.संभाजीनगर, पुणे आणि नागपूरसह महाराष्ट्राच्या विविध भागात निदर्शने सुरू झाली आहेत. सध्या पोलिसांचे वेगवेगळे पथक तपासाच्या वेगवेगळ्या दिशेने काम करत आहेत.
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि तणाव वाढू नये म्हणून एनआयए पथक परिस्थितीचा आढावा घेणार आणि तणाव वाढू नये म्हणून आवश्यक ती पावले उचलणार आहे. हा प्रश्न शांततेने सोडवण्यासाठी हे पथक स्थानिक अधिकारी आणि विविध समुदायांच्या प्रतिनिधींशी देखील भेटेल. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि कोणत्याही अनुचित घटना टाळण्यासाठी परिसरात संशयित हालचालींवर लक्ष ठेवून आहे. परभणी, जालना, नांदेड या ठिकाणीदेखील एनआयए पथक संशयित हालचालींवर लक्ष ठेवून आहे. या प्रकरणात एटीएस अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याची माहिती आहे.