मुंबई: जम्मूमध्ये पाकिस्तान कडून करण्यात आलेल्या गोळीबारात मुरली नाईक हे शूर भारतीय सैनिक शहीद झाल्याची दुखद बातमी समोर आली आहे. नाईक जम्मूमध्ये तैनात होते. नाईक हे आंध्र प्रदेशचे रहिवासी होते परंतु ते त्यांच्या कुटुंबासह मुंबईतील घाटकोपर भागात राहत होते. त्यांच्या इमारतीच्या पुनर्विकास प्रकल्पामुळे त्यांचे कुटुंब तात्पुरते आंध्र प्रदेशात स्थलांतरित झाले होते. नाईक यांच्या शहीद होण्याच्या बातमीने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.
पहलगाम येथे अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असताना ही घटना घडली आहे. भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले करून प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये गोळीबारांची मालिका सुरूच आहे.