मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज (4 मार्च) सुनावणी झाली. मात्र, यावर अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही, किंवा न्यायालयाने कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. न्यायालयाने पुढील सुनावणीची निश्चित तारीख अद्याप दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील महापालिकांच्या रखडलेल्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार आहेत.
आजच्या (दि. 4) सुनावणीदरम्यान राज्य सरकारकडून तुषार मेहतांनी आणखी वेळ मागितला आहे. तसेच दोन्ही बाजूच्या याचिकाकर्त्यांमध्येच कन्फ्युजन आढळल्याने कोर्टाने सांगितले आहे. सर्व कागदपत्रे सादर करा, पुढील वेळी आम्ही सुनावणी करू, असं देखील कोर्टाने म्हटलं आहे. त्यातच पुढची तारीख अनिश्चित असल्यामुळे आता निवडणुका या पावसाळ्यानंतरच होणार हे जवळपास नक्की झाले आहे.