मुंबई : गरिबांना हक्काचे घर मिळावे या उद्देशाने प्रधानमंत्री ग्रामीण घरकुल योजना सुरु करण्यात आली होती. आता या घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.आतापर्यंत घरकुलासाठी १.२० लाख रुपयांच्या अनुदानात अजून ५० हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.
प्रधानमंत्री ग्रामीण घरकुल योजने संपूर्ण टप्पा केवळ एकाच वर्षात पूर्ण: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
या योजनेअंतर्गत महाराष्ट्राला २० लाख घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जे देशातील सर्वात जास्त घरकुलांपैकी आहे. प्रधानमंत्री ग्रामीण घरकुल योजने अंतर्गत मागच्या ४५ दिवसांत १००% घरांना मंजुरी मिळाली आहे. आतापर्यंत यातील १०.३४ लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. या योजनेतील राहिलेल्या १० लाख लाभार्थ्यांनाही लवकरच निधी वितरित केला जाणार आहे. प्रधानमंत्री ग्रामीण घरकुल योजने संपूर्ण टप्पा केवळ एकाच वर्षात पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे.
योजनेसाठी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय
लाभार्थ्यांनी वेळोवेळी अनुदान अपुरे पडत असल्याची तक्रार येत आहे. आता जो निधी दिला जात आहे त्यात घर बांधणे कठीण असल्यामुळे अनेक प्रकल्प अर्धवट राहिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या योजनेसाठी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या संदर्भात राज्य सरकार पुढील अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील घरकुल प्रकल्पांनागती मिळेल.