पुणे प्राईम न्यूज डेस्क: पती-पत्नीचे नाते हे प्रेमाचे, जिव्हाळ्याचे तितकेच जबाबदारीचे असते. त्यामुळे हे नातं जपणं महत्त्वाचे ठरू शकते. पण, त्याकडे दुर्लक्ष केल्यास नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. तेव्हा घटस्फोटापर्यंतही विषय जाऊ शकतो. घटस्फोटाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्या घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे.
काही वर्षापूर्वी, जोडपे प्रेम नसतानाही एकमेकांसोबत राहत होते. पण आता समाज बदलत आहे. स्त्री असो वा पुरुष, बळजबरीने कोणालाच लग्नात अडकायचे नाही. मात्र, काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचे आहे. त्यात लग्नानंतर जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत राहायला सुरुवात करता तेव्हा हळूहळू त्या व्यक्तीच्या उणीवा समोर येऊ लागतात. काही वेळा तुम्हाला त्याच्या या कमतरता आवडत नाहीत. अनेक वेळा, जोडीदार त्याच्या/तिच्या उणीवांचा वापर जोडीदाराचा अपमान करण्यासाठी शस्त्र म्हणून करतो किंवा त्याचा आदर करत नाही. आदर नसल्यामुळे नातीही तुटतात.
लग्नानंतर अनेक जोडप्यांमध्ये प्रेम काही कालांतराने कमी होऊ लागते. प्रेमविवाह करणाऱ्यांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात, ज्यामुळे ते एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत हेच त्यांच्यातील अंतराचे कारण बनते. तसेच विवाहित लोक त्यांच्या भावनिक किंवा शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी विवाहबाह्य दुसऱ्या व्यक्तीशी नातेसंबंध जोडतात. त्यामुळे त्यांचे लग्न मोडते. असा प्रकार वारंवार समोर येत आहे.