पुणे: नवीन गार, जुने गार व बेटवाडी यांची ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या गार ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी वैशाली सतीश येडे यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच राणी सचिन भुजबळ यांनी कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी वैशाली सतीश येडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवीनगार, मुळगार व बेटवाडी ही ग्रुप ग्रामपंचायत असून गार ग्रामपंचायतमध्ये आमदार राहुल कुल गटाची सत्ता असून निवडणुकीवेळी ठरल्याप्रमाणे व सरपंच पद हे ओबीसी महिलासाठी राखीव असल्याने सर्वप्रथम डॉ. सुलभा संदीप गावडे यांना संधी देण्यात आली त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर राणी सचिन भुजबळ यांना सरपंच पद देण्यात आले होते, आता वैशाली सतीश येडे यांना सरपंच पद देण्यात आले आहे. सरपंच निवडणुकही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली .
या निवडीमुळे गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला सरपंच पदावर काम करण्याची संधी मिळली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दौंड मंडल अधिकारी यांनी काम पाहिले तर ग्रामसेवक संतोष निंबाळकर यांनी सहकार्य केले.
सरपंच पदी नेमणूक झाल्याबद्दल गावच्या वतीने वैशाली येडे यांची भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब नांदखिले, डॉ.संदीप गावडे, उपसरपंच संभाजी होले, सचिन भुजबळ,शिवाजी निवंगुणे, नथूराम पासलकर, संतोष शितकल, लता नांदखिले, स्नेहल निवंगुणे, सुलभा गावडे,मनिषा वायसे, राम सुर्वे, कालीदास घाडगे,संपत वायसे, सचिन वायसे,संपत वायसे,फिरोज सय्यद, संदिप कांबळे, संजय नांदखिले, रोहिदास नाझिरकर, माजी सरपंच तात्या येडे यांसह आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
सरपंच पदी विराजमान झाल्यानंतर वैशाली येडे यांनी गावकऱ्यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता सर्वांना विश्वासात घेऊन गावच्या विकासासाठी सर्वांगीन प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.