पुणे : राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांनी सरकार आणि पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. अशातच पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणानं वातावरण ढवळून निघाल आहे.या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना तीन दिवस लागले. शिरूर येथील गुनाड गावच्या शिवारात त्याला अटक करण्यात आली. यानंतर आता आरोपी दत्ता गाडेचा एन्काऊंटर करणार का?असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आरोपीला पोलिसांनी पकडल आहे, आज कस्टडी मिळेल त्यानंतर चौकशी होईल काही तांत्रिक आणि फॉरेन्सिक माहिती समोर आली की त्या एकत्रित करून यावर बोलणं योग्य राहील असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.
दरम्यान राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बलात्कार घटनेवर बोलताना पिडीतेकडून कोणताही विरोध झाला नसल्याच म्हटलं होतं.या विधानाचाही समाचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यावर बोलताना ते म्हणाले, निश्चितपणे जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी अशा घटनावर बोलताना संवेदनशील पणे बोलावं असा माझा सल्ला आहे. तथापि ते नवीन युवा मंत्री असून काहीतरी करण्याचा ते प्रयत्न करतायत पण मी सल्ला देईल की बोलताना संवेदनशील पण बोलले पाहिजे,असं स्पष्ट त्यांनी सांगितलं.
दरम्यान दिवसेंदिवस वाढत असलेल्या या गुन्हेगारी घटनांनी महिलांची सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टाकली जात आहेत. आता या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे यांच्या अटकेनंतर त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपीला अटक झाली आहे तो लपून बसला होता,त्याला पोलिसांनी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून शोधून काढलं,लवकर या घटनेचा पर्दाफाश होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं.