बापू मुळीक
सासवड : पुरंदर तालुक्यातील भरपूर प्रमाणातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. तर सध्या उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता ही भासू लागली आहे. त्यामुळे दूध उत्पादनामध्ये घट होताना दिसून येत आहे. हिरव्या चाऱ्या अभावी जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. अशा या कारणामुळे शेतकरी आता हिरव्या चाऱ्यासाठी वणवण फिरत आहे. चाऱ्याच्या अभावी जनावरांच्या आरोग्यावरही देखील परिणाम होताना दिसून येत आहे.
पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षी पाणी उपलब्ध काही प्रमाणात आहे. तर बहुतेक शेतकऱ्यांनी पुरंदर उपसा जलसिंचन, जानाई शिरसाई योजना या योजनेच्या माध्यमातून हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेतले आहे. सध्या तरी मागणी वाढल्याने मका तब्बल 4000 रुपये या भावाने खरेदी करावी लागत आहे. एकीकडे दुधाचे घटलेले बाजारभाव, रखडलेले अनुदान, यामुळे शेतकरी हा पूर्णपणे मेटाकोटीला आला असल्याचे दिसून येत आहे. शासनाने दुध दरात वाढ करावी, तसेच दुधावर अनुदान द्यावे. अशी मागणी ही दूध उत्पादक शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे.
सध्या दुखत्या जनावरांना अक्षरशः कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे नाईलाजाने या जनावरांचा सांभाळ करणे ही अशक्य झाले आहे. दुग्ध व्यवसायिक पुरंदर तालुक्यातील यांनी ही व्यथा व्यक्त केली आहे.