पुणे : पुण्याच्या स्वारगेट परिसरात तरुणीवर शिवशाही बसमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने राजकीय वातावरण आता चांगलेच तापलं आहे. यावर आता काँग्रेस आक्रमक झाले असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवाराने केलेल्या आरोपाने खळबळ उडाली आहे. नागपूरचा भोसले अधिकारी पुण्यात नेऊन बसवल्यामुळे घटना घडत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यात राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कायम वर्दळ असलेल्या ठिकाणी स्वारगेट बस स्थानकात अशा घटना घडत असतात.घटना घडली तेव्हा यंत्रणा काय करत होती शिवशाहीच्या बस मध्ये सापडलेल्या वस्तू धक्कादायक आहेत यामुळेत्या ठिकाणी चार रिकाम्या बस महिलांच्या शोषणसाठी वापरल्या जात होत्या का? असा प्रश्न निर्माण होतो. या भर वर्दळ असलेल्या घटनेची जबाबदारी सरकारने आणि एसटीच्या डेपो ने स्वीकारली पाहिजे. नवी सरकारने कायदा करण्याची गरज होती, मात्र त्यांना महिलांच्या सुरक्षित काही पडलेले नाही. या घडलेल्या घटने संदर्भात आम्ही विधानसभा अधिवेशनात उचलू. गृह विभागाचा आणि कायद्याचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो, असंही पुढे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
या सरकारमुळे महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही, आमच्या सरकारने शक्ती कायद्यासंदर्भात तयारी केली होती मात्र आमचं सरकार गेलं.स्वारगेट बस स्थानकावर असणारे सिक्युरिटी गार्ड काय करत होते. महिलांच्या बाबतीत घडत असलेल्या घटनांमधून गृह विभागाला काहीच पडलेली नाही हे दाखवून देतो.नवीन सरकारने कायदा तयार करण्याची गरज होती. मात्र तसं झालेलं नाही. यांना महिला सुरक्षेची अजिबात चिंता नसून हे सत्तेत रमले आहेत असा टोला
विजय वडेट्टीवार यांनी लगावला. दरम्यान दुसरीकडे या प्रकरणातील आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. आरोपी पोलिसांच्या कधी ताब्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.