पुणे : वाहतूक कोंडीसाठी चर्चेत असलेल्या पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंद ऋषीजी महाराज चौकापासून ते सिमला ऑफिस चौका दरम्यान दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा असून प्रवासातील वेळेची बचत ही होणार आहे.
गणेशखिंड रस्त्यावर टाटा मेट्रोकडून पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहन चालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मागील 26 नोव्हेंबर पासून वाहतूक वळवण्यात आली होती. मात्र ही वाहतूक एबिल कॉर्नर -सिम्पनी सर्कल ते न.ता.वाडी मार्गे सुरु होती.त्यामुळे वाहन चालकांना लांब वळसा घालून जावे लागत होते.मात्र आता पुणे विद्यापीठ चौक ते सिमला ऑफिसचा चौकदरम्यान दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.