दिल्ली : घरात प्रचंड कोट्यवधींचं घबाड सापडल्याने वादग्रस्त ठरलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करावा या मागणीने जोर धरला आहे.यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे मात्र अद्यापही त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी होळीदिवशी झालेल्या अग्निकांडात पैशाचे घबाड सापडले यानंतर संपूर्ण न्यायव्यवस्था हादरली. त्यानंतर त्यांची कॉलेजियमने अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली केली आहे. मात्र न्यायव्यवस्थेत प्रचंड खळबळ उडाली असून बदली करण्याच्या कॉलेजियमच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी न्यायमूर्तींची बदली नको थेट राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.आता प्रश्न असा आहे की त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करता येऊ शकतो का? त्यांच्यावर खटला दाखल करता येऊ शकतो का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी एका 34 वर्षे जुन्या खटल्याच्या पुस्तकाची पाने उलटावी लागतीलं. मात्र त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याने न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खटला चालवता येऊ शकतो, पण त्यासाठी काही नियम आणि अटी आहेत. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.