पुणे : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आपल्या बेताल वक्तव्यामुळे कमी वेळेत अनेकदा चर्चेत आले आहेत.आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले असून जुन्या प्रकरणातून नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असताना आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जितेंद्र आव्हाड अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या राजीनाम्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ते पत्र पाठवणार आहेत. त्यामुळे कोकाटे यांच्या अडचणीत आणखीनच वाढ होणार आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात पन्नास हजार रुपये दंड आणि दोन वर्षाचा कारावास सुनावला. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधारी माणिकराव कोकाटे यांना वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित केला आहे. याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले,सुनील केदार आणि राहुल गांधी यांना एक वेगळा न्याय आहे आणि सत्ताधारी माणिकराव कोकाटे यांना वेगळा न्याय दिला जातोय, असा आरोप त्यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील या पत्रातून केली जाणार आहे.
दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष खोटे बोलत आहे त्यांच्या वरती दबाव आहे असा आरोप केला आहे. दरम्यान पुढे बोलताना त्यांनी चाळीस आमदार अपात्रची जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती तेव्हा निकाल पत्र अडखळत वाचत होते. 40 आमदार अपात्र झाले नाही अभयदान दिले,त्यांच्याकडून काय अपेक्षा करता असा टोला देखील त्यांनी विधानसभा अध्यक्षांना लगावला.