पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे एका प्रकरणामुळे वादाच्या चांगलेच भोवऱ्यात अडकले आहेत. 2016 मध्ये आमदार असताना एका महिलेला त्रास देत व्हाट्सअपवर विवस्त्र फोटो पाठवल्याच त्यांचं प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार आरोप करत टीकेची झोड उठवली. विरोधकांच्या या आरोपांचे मंत्री जयकुमार गोरे यांनी खंडन केलं आहे. ते म्हणाले, माझी बदनामी करणाऱ्यांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहे, माझ्या वडिलांच्या निधनानंतर अस्थि विसर्जन ही त्यांनी करून दिल नाही, विरोधकांनीं खालच्या पातळीचे राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याच्या प्रकरणावरून गंभीर आरोप करण्यात येत आहेत. त्याचबरोबर त्या महिलेला अद्यापही त्रास दिला जात असल्याचा आरोप ही त्यांच्यावर केला जात आहे. या आरोपाच आता त्यांनी खंडन केलं असून मी त्या महिलेला त्रास देतोय की नाही या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी. जे कोण दोषी असेल या खोट्या भानगडी करत आहे त्यांच्यावर कारवाई करावी असं आवाहन गोरे यांनी दिल आहे. तसेच यासंदर्भात ज्यांनी ज्यांनी आरोप केले आहेत त्या प्रत्येकावर मी सभागृहात हकभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याचे गोरे यांनी नमूद केल आहे. त्या लोकाविरोधात बदनामीचा खटला दाखल करून त्यांना कोर्टात खेचणार असल्याच त्यांनी स्पष्ट सांगितल आहे.
या आरोपाबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, या देशात लोकशाही आहे आपल्यासमोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने दिलेल्या निकालाला आता सहा वर्षे झाली आहेत. मात्र सहा वर्षानंतर पुन्हा हा विषय समोर आला आहे.. आपण कुठल्या वेळी कोणता विषय समोर आणावा याबद्दल राजकीय नेत्यांनी मर्यादा ठेवली पाहिजे असं मला वाटत, विरोधकांनी एवढ्या खालच्या पातळीचे राजकारण करू नये असं गोरे यांनी म्हटलं आहे.