पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित महापालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला असून आता या प्रकरणाची पुढील सुनावणी चार मार्चला होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांनी आगामी मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख दिली जात असल्यामुळे इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले गेले. त्यामुळे आता चार मार्चपर्यंत त्यांना वाट पहावी लागणार आहे. दरम्यान निवडणुका रखडल्याने मुंबई पुण्यासह राज्यातील 23 महापालिका वर प्रशासकीय राजवट आहे. ओबीसी आरक्षण प्रभाग रचना इत्यादी वरून निवडणूक संदर्भात सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल आहेत. त्यावर सुनावणी 22 जानेवारी रोजी होणार होती. त्यानंतर 28 जानेवारी सुनावणी झाली नाही त्यानंतर कोर्टाने पुढील सुनावणी 25 फेब्रुवारी रोजी होती मात्र त्यावरही सुनावणी झाली नाही त्यामुळे याचिकेवर आता चार मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालय तारीख पे तारीख पडत असल्यामुळे राज्यातील प्रलंबित असलेल्या नाशिकसह 25 महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर पडला आहे. आता पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिला आहे.